Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रक्त पुरवठा कमी झाला, रक्तदानासाठी पुढाकार घ्या

Webdunia
गुरूवार, 1 एप्रिल 2021 (21:26 IST)
मुंबईसह राज्यात पुढील ५ ते ६ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. राज्यात कोरोना काळात रक्तदानाच्या साठ्यात मोठ्याप्रमाणात घट होत आहे. यात महत्त्वाच्या शस्त्रक्रियांसाठी लागणारी रक्ताची मागणी पुर्ण करण्यास अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन शिंगणे यांनी केले आहे.
 
राजेंद्र शिंगणे यांनी  मुंबईसह राज्यातील रक्त साठ्याबाबत आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिंगणे म्हणाले की, पुढील ५ ते ६ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. यात राज्यात कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून रक्त पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी रक्तदानासाठी पुढे यावे. नियमित रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. यामध्ये राजकीय नेते, रुग्णालये आणि विविध सामाजिक संघटनांनीही रक्तदानासाठी पुढाकार घेत रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख