Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यावर पुन्हा एकदा आस्मानी संकट

Webdunia
बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (16:59 IST)
राज्यात पुन्हा एकदा अस्मानी संकटांना हाक दिली आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्यामुळे महाराष्ट्र राज्याला आयएमडीकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतातून येणारे मोसमी वारे परतून जवळपास एक महिना झाला आहे. मात्र, महाराष्ट्रासह दक्षिण भारतात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. 
 
हवामान खात्याने आज एकूण चार जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत येथे मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
 
हवामान खात्याने आज सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे. येत्या तीन ते चार तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान आकाशात विजा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आकाशात विजांचा लखलखाट होत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच मोठ्या झाडाच्या कडेला उभे राहू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments