Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भर दुष्काळात लातूरच्या त्या विहिरीकडे दुर्लक्ष, भागवली होती ७२ सालात तहान

Latur well
Webdunia
बुधवार, 29 मे 2019 (18:03 IST)
फाईल फोटो
प्रशासन जागे नसेल तर कश्या प्रकारे अडचणी वाढतात याचा उत्तम नमुना दुष्काळी लातूरमध्ये पहायला मिळतो आहे. ही बातमी आहे एका विहरीची जी शहरातील मध्यभागी असून भर उन्हात त्यात चक्क पाणी आहे. मात्र या विहरीकडे मनापा आणि त्या भागातील नगरसेवकाने इतके दुर्लक्ष केले आहे कि त्या विहारीतील पाणी खराब झाले आहे. 
 
लातूर शहरातील गोरक्षणच्या १०५ फुटी ऐतिहासिक विहिरीत ७० ते ७५ फूट पाणी अजूनही दिसते आहे. जर येथून पाणी उपसल तर पुन्हा विहीर परत भरते,  या विहिरीनं १९७२ च्या दुष्काळात लातुरकरांची तहान भागवली होती, मात्र  नंतर विहिरीचा उपयोग फक्त गणपती विसर्जनासाठी करण्यात आला होता. परत जेव्हा २०१६ मध्ये भीषण पाणी टंचाई आली तेव्हा सुकाणू समितीनं प्रशासनाच्या मागे लागून या विहिरीचं खोलीकरण करुन घेतलं, गाळ काढून घेतला. मग या विहिरीतून गोरक्षणवासियांना पाणी मिळालं होते. रोज २० ते २५ टॅंकर शहरासाठी जाऊ लागले. पुन्हा पाऊस झाला अन सगळे या विह्ररीला पुन्हा विसरुन गेले होते. मग नंतर मनपाने वीज पुरवठा बंद केला. सोबतच पाणी काढायची मोटारही काढून नेली.
 
मात्र आज दुष्काळी स्थितीत या विहिरीत मुबलक पाणी आहे. मात्र शहरात बाहेरुन पाणी आणले जाते. पण शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या जीवंत आणि खात्रीच्या स्रोताकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. या भागातले नगरसेवकही याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. निवडणुकीपुरते येतात पुन्हा तोंडही दाखवत नाहीत असा आरोप या भागातील नागरिक करतात. त्यामुळे आता या विहिरीची योग्य काळजी घेतली आणि तिला स्वच्छ केले तर त्या भागातील नागरिकांचे काही प्रमाणात तहान भागवली जाऊ शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

कामगार दिनाच्या शुभेच्छा Labour Day 2025 Wishes In Marathi

कॅनडामध्ये चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भारतीय विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला, हत्येचा संशय

ठाण्यात लाच घेताना तलाठीच्या विरुद्ध एसीबी कडून गुन्हा दाखल

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची नोंदणी एनईएमएल पोर्टलवर होणार उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले

Maharashtra Din 2025: महाराष्ट्र दिन संस्कृती आणि परंपरा जपणारा खास दिवस

पुढील लेख
Show comments