Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

8 ऑक्टोबरला मुंबईमधून मान्सून निरोप घेणार, हवामान विभागाची माहिती

Webdunia
शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (21:07 IST)
मान्सूनबाबत हवामान विभागाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. येत्या 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे. तर  8 ऑक्टोबरला मुंबईमधून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, 26 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. परतीच्या प्रवासात उत्तर मान्सून सक्रिय झाला आहे.
 
देशात जून महिन्यामध्ये पावसाने उघडीप दिली होती. परंतु, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने राज्यात धुमाकूळ घातला होता. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील देशात पावसाने हजेरी लावली होती. देशातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अतवृष्टी देखील झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
 
शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. देशातील २४ जिल्ह्यात सरासरीपेक्षा ६० टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 1 जूनपासून देशात सर्वच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bornahan बोरन्हाण साठी लागणारे साहित्य आणि विधी

Gajanan Maharaj Durvankur गजानन महाराज दुर्वांकुर

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

रिकाम्या पोटी चहा प्यायलात तर हे जाणून घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय लगेच वापरून पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुण्यात भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू

पुण्यात ट्रकने कारला दिली धडक, भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू

केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना लिहले पत्र, म्हणाले दिल्ली मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना 50 टक्के सूट द्यावी

बीडमध्ये दोन भावांची निर्घृण हत्या

सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी संशयताला अटक, वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू

पुढील लेख
Show comments