Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्याच्या काही भागात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट, काळजी घेण्याचे आव्हान

Webdunia
गुरूवार, 7 एप्रिल 2022 (12:58 IST)
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात कमालीची वाढ होत असताना दिसत आहे. अशातच मराठवाडा, विदर्भात सध्या तापमानात वाढ होत असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या अनेक भागात तापमान 40च्या पार गेले असताना पुढचे काही दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
 
पुढचे दोन दिवस मराठवाड्यात तर विदर्भात पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट असणार आहे. तर मध्य महाराष्ट्रात देखील पुढचे दोन ते दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
 
येत्या 48 तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट तर दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
 
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र शुक्रवारी वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला गेला आहे. 
 
दरम्यान मागील काही दिवस पुण्यातील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस आणि त्या आसपास होते. परंतु बुधवारी 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर 6 एप्रिल रोजी अकोला येथे सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
 
दरम्यान, महाराष्ट्रासह राजस्थान, दक्षिण हरियाणा-दिल्ली, पंजाब, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, छत्तीसगड या राज्यात देखील उष्णतेच्या लाटेची परिस्थिती असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments