Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऊर्जामंत्री विश्रामगृहात आले आणि वीज पुरवठा खंडित झाला; जळगावमधील प्रकार

Webdunia
शुक्रवार, 13 मे 2022 (21:03 IST)
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत जळगाव दौऱ्यावर आले असताना एक प्रकार घडला आहे. त्याची सध्या राज्यभरात चर्चा होत आहे. राऊत हे गुरुवारी रात्री उशीरा भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या विश्रामगृहावर आले. ते येऊन काही वेळ होत नाही तोच विश्रामगृहातील वीज पुरवठा खंडित झाला. ऊर्जामंत्र्यांच्या उपस्थितीतच वीज पुरवठा खंडित झाल्याने अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. अखेर काही वेळाने हा पुरवठा सुरळीत झाला.
 
विशेष म्हणजे, या सर्व प्रकाराचा ऊर्जामंत्र्यांनाच खुलासा करावा लागला आहे. राऊत म्हणाले की, सध्या लोडशेडिंगबाबत ज्या चर्चा आहेत त्या निवळ वावड्या उठविण्यात येत आहेत. काही ठिकाणी काही वेळेसाठी वीज पुरवठा खंडित झाला तर त्याला काही कारणे असतात. जास्त लोड आल्याने आणि डिपीवर उष्णता वाढल्यामुळे वीज बंद पडते, याचा अर्थ त्याला लोडशेडिंग सुरू आहे असं म्हणता येणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments