Dharma Sangrah

नवतपा म्हणजे काय, त्यामुळे उष्णता का वाढते? जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 25 मे 2020 (12:55 IST)
प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात नवतपाला सुरुवात होते. यंदा 25 मे रोजी नवतपा सुरू होत आहे. नवतपा मध्ये पृथ्वीवर उष्णता प्रचंड वाढते. हिंदू ज्येष्ठ महिन्यात नवतपा येतं. 

नवतपा काय आहे आणि या मुळे उष्णता का वाढते? जाणून घेऊया थोडक्यात याबद्दल माहिती. 
 
नवतपा म्हणजे काय : सूर्य ज्यावेळी रोहिणी नक्षत्रात 15 दिवसांसाठी येतो, त्यावेळी त्या 15 दिवसामधील सुरुवातीचे 9 दिवस नवतपा म्हटले जातात. या 9 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारे पाऊस आणि थंड वारं नसल्यास मान्सूनमध्ये चांगला पाऊस येणार असे मानले जाते. 
 
असे का होते : सूर्य 12 राशी आणि 27 नक्षत्रांमध्ये प्रवास करत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य कुंडलीत ज्या ग्रहांबरोबर बसतो, त्याचा प्रभाव कमी करून देतो. रोहिणी 
 
नक्षत्राचे अधिपती चंद्रमा आहे. अश्या वेळी जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो चंद्राचा थंडावा संपवून उष्णता वाढवतो. त्यामुळे पृथ्वीला थंडावा मिळत नाही आणि उष्णता प्रचंड वाढते. 
 
नवतपाच्या वेळी सूर्य किरणं थेट पृथ्वीवर येतात ज्यामुळे तापमानात वाढ होते. या उच्च तापमानामुळे मैदानी क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र बनते जे समुद्री लाटांना आकर्षित करतं. यामुळे अनेक ठिकाणी थंड, वादळ आणि पाऊस येण्याची दाट शक्यता असते. या वेळी वारं वाहत असलेले चालते पण पाऊस नसावा. असे झाल्यास पाऊस व्यवस्थित होईल. असं म्हणतात की चांगल्या प्रकारे शिजवलेल्ल्या अन्नाची चव चांगलीच येते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नेदरलँड्सचे महापौर नागपूरच्या रस्त्यांवर त्यांच्या आईचा शोध घेत आहे; ४१ वर्षांपूर्वी या घटनेने केले होते वेगळे

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, सागरी हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी बोटीला ताब्यात घेत ९ क्रू मेंबर्सना अटक

LIVE: 'निवडणुकीची शाई सॅनिटायझरने पुसली जात आहे', कुटुंबासह मतदान केल्यानंतर राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये ५२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले

धुळे येथे महापालिका निवडणुकीदरम्यान हिंसाचार, शिवसेना नेत्याच्या घरावर हल्ला

पुढील लेख
Show comments