Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या आर्थिक वर्षात नवीन योजना सुरू करु नका

Webdunia
शुक्रवार, 5 जून 2020 (17:32 IST)
कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. लॉकडाऊनमुळे महसूल तोटा झाला आहे, शिवाय सरकारचा खर्चही वाढला आहे. या परिस्थितीचा परिणाम सरकारच्या नव्या योजनांवर होऊ लागला आहे. मंदावलेल्या अर्थव्यस्थेचा विचार करता केंद्र सरकारने नव्या योजना स्थगित केल्या आहेत. वित्त मंत्रालयाने सर्व मंत्रालयांना या आर्थिक वर्षात नवीन योजना सुरू करु नका असा निर्देश दिला आहे.
 
केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियान, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना स्थगित केलेल्या नाही आहेत. अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार यावर्षी कोणत्याही सरकारी योजनेस मान्यता दिली जाणार नाही. यापूर्वी मंजूर झालेल्या नवीन योजना ३१ मार्च २०२१ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. आत्मनिर्भर भारत आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना देण्यात आली आहे. या आदेशात म्हटलं आहे की, “स्थायी वित्त समितीच्या प्रस्तावांसह (५०० कोटी रुपयांपेक्षा जास्तच्या योजना) २०२०-२१ या आर्थिक वर्षात आधीच मंजूर किंवा अनुमोदीत केलेल्या नवीन योजनां स्थगित करण्यात आल्या आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments