Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गिरणी कामगारांना एकत्रितरित्या घरे देण्याचा प्रयत्न -जितेंद्र आव्हाड

Webdunia
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (16:34 IST)
मुंबईतील गिरणी कामगारांना 'नाविकास' क्षेत्रात एकत्रितरित्या घरे देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने म्हाडा आणि महसूल विभागाने पाहणी करून येत्या पंधरा दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले. मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांबाबत  झालेल्या बैठकीत आव्हाड बोलत होते. त्यांनी म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसनाच्या काही रखडलेल्या योजनांचाही आढावा घेतला व योजना गतीने पूर्ण करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
 
मुंबईतील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाचे काम रखडल्याने स्थलांतरासंदर्भातील प्रश्नावरील उपाय योजना व बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या मागण्यांच्या अनुषंगानेही आव्हाड बैठक घेतली. बीडीडी चाळीतील रहिवाशांची पात्रता-अपात्रता निश्चित करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून ‘बीडीडी सेल’ स्थापन केला जाईल, असे आव्हाड यांनी सांगितले. रहिवाशांच्या पात्रतेचे निकष ठरविण्यात यावेत आणि हीप्रक्रिया सुलभ करावी, असेही निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments